अर्णब गोस्वामीसह सरकारमधील उच्चपदस्थांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- वसई विरार काँग्रेस

वसई : गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्ये केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वेन्सी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्हिने दुरदर्शनला पैसे देता त्यांच्या फ्रिक्वेन्सी वापरणे हा गुन्हा टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे असे म्हणत दुरदर्शनने माहिती प्रसारण मंत्री राजवर्धन राठोड यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येत आहे. याचाच अर्थ केंद्रातील मोदी सरकारचा गोस्वामीला पाठिंबा आहे. जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्नब गोस्वामी विरोधात केंद्र सरकार कारवाई का करत नाही? या व्हाट्सअप चॅट वरून अर्नब गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध असून त्यांनी त्याला नियमाच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे म्हणत त्यासोबतच पुलवामा हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे, तो निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर का केला? याचे उत्तरही केंद्रातील भाजप सरकारने दिले पाहिजे. अर्नब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणात एकटा अर्नब गोस्वामीच दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथेचा भंग करून गोस्वामीचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचे तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा सुद्धा राष्ट्रद्रोहाचाच भाग असून या प्रकरणात गोस्वामीला मदत करणाऱ्या उच्च पदस्थांवर देखील तात्काळ कारवाई केली पाहिजे या मागणीसाठी वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते, पदाधिकारी, सर्व फ्रंटलचे आणि विविध सेलचे पदाधिकारी कायकर्त्यांसह शुक्रवार दि. २२ जाने. २०२१ रोजी दुपारी ते सायं वाजेपर्यंत वसई पश्चिमेला अंबाडी रोडवरील स्कायवॉक खाली रहदारीला वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण करता आणि कोरोनाचे नियम  सामाजिक अंतर पळून जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.

   रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत असल्याचे म्हणत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली? देशाच्या संरक्षणविषयक महत्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली? ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली? असे गंभीर प्रश्न उपस्थित करत त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्याने स्वतः सांगितले आहे की, ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकार मधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे official secrets act,1923, sec.5 नुसार कार्यालयीन गोपनियतेचा भंग करणारे तर आहेच परंतु हा देशद्रोहाचा प्रकार सुद्धा आहे. त्यामुळे रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल याची कृपया गंभीर नोंद घ्यावी असा गर्भित इशारा वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान अर्णब गोस्वामीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी उपस्थित महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी अर्णब याच्या प्रतिमेला चप्पला मारून आपला राग व्यक्त केला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष दिनेश कडुलकर, के अश्रफ,

अल्पसंख्यांकचे अर्षद डबरे, बोईसर विधानसभा अध्यक्ष शेहजाद मलिक त्यांचे सहकारी, विरार ब्लॉक अध्यक्ष नितीन उबाळे, पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसई ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा बिना फुर्ट्याडोंसह २५० ते ३०० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

टिप्पण्या