तानसा नदीच्या पुलावरील संरक्षक भिंतीची त्वरीत दुरूस्ती करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे युवक काँग्रेसची मागणी
वसई ( प्रतिनिधी ) शहापूर या मार्गावर रोज हजारो वाहनांची वर्दळ असते . येथील तानसा - आगळी रोडच्या भावशे गावातील तानसा नदीपात्रावर ७ ते ८ फुटांच्या एकेरी मार्ग असलेल्या रस्त्यावर वाहानांच्या सुरक्षेसाठी एक लोखंडी पूल अर्थात संरक्षक भिंत बांधण्यात आली . ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला . एवढया वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत उनपावसाच्या माऱ्यामुळे तसेच देखभाली अभावी लोखंडी पुलाची दुर्दशा होऊन तो गंजून त्याच्या दोन्ही बाजूच्या काही भागातील संरक्षक पट्टया तुटल्या आहेत .
रस्ता अरूंद असल्याने एका वाजूने चार चाकी वाहन आल्यास समोरून येणाऱ्या दुचाकी वाहान चालकास पुलावरून वाहन वाजूला घेणे शक्य होत नाही . पादचारी सुद्धा अरूंद रस्ता आणि तुटलेला पूल यामुळे वाजूला जाऊन थांबू शकत नाहीत . पूल नादुरुस्त असल्याची सुचना दर्शविणारा कोणताही फलक रस्त्याच्या दुर्तफा लावलेला नसल्याने वाहन चालकांना मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतीची कल्पना येत नाही .
पुलाखालून वाहणारी नदी ५० फूट खोल असल्याने एकाद्या वेळेस चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष कुलदीप वर्तक काही दिवसांपूर्वी या मार्गावरून चारचाकी वाहनातून जात असताना ही वाव त्यांच्या लक्षात आली व संबंधित धोकादायक पुलाच्या संरक्षक भिंतीची त्वरीत दुरूस्ती होणे आवश्यक असल्याने त्यांनी मा . अशोकराव चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच वृहन्मुंबई महानगर पालिका यांना दि .१४ .१२.२०२० रोजी पत्र पाठवून संबंधित पुलाची पहाणी करून त्वरीत दुरूस्तीचे आदेश देण्याची मागणी केलीआहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा