राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे ७७८ नवीन रुग्ण ; एकूण रूग्णांची संख्या ६४२७ तर १४ जणांचा मृत्यु
राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे ७७८ नवीन रुग्ण ; एकूण रूग्णांची संख्या ६४२७ तर १४ जणांचा मृत्यु
मुंबई – राज्यात आज कोरोनाच्या ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६४२७ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
करोनाबाधितांची संख्या जसजशी वाढत आहे, तशी राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात करोनाच्या ७७८ नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनाबाधितांची एकूण संख्या ६४२७ झाली आहे. तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत ६, पुणे ५, नवी मुंबई, नंदुरबार आणि धुळ्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. मृत्यूपैकी आठ पुरूष तर, सहा महिला आहेत. दोघेजण ६० वर्षांवरील आहेत. ४० ते ५९ वयोगटातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृत तीन रुग्ण हे ४० वर्षांखालील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत ८४० जण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत. तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
आज राज्यात १४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या दोन रुग्णांबाबत इतर आजारांची माहिती अद्याप मिळू शकली नाही.उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये ( ५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा